Tuesday 21 February 2017

योग्य उपाय आणि लोकसहभाग - यशाची गुरुकिल्ली

योग्य उपाय आणि लोकसहभाग - यशाची गुरुकिल्ली 

लोकसहभाग आणि योग्य उपाय किती बदल निर्माण करू शकतात आणि यश मिळणं कसं सोपं होतं हे सांगण्यासाठी ही पोस्ट. 
मागच्या आठवड्यात जनकल्याण समितीसाठी जव्हार आणि मोखाडा भागात होतो. लोकसहभागातून जलसंधारण करण्यासाठी पहिला टप्पा म्हणून ११ गावांचं सर्वेक्षण केलं, पाण्याचे स्त्रोत आणि टंचाई याबद्दल माहिती घेतली, ग्रामसभा घेतल्या. हे करत असताना वाटेत आम्ही २००९ साली काम केलेल्या "इखरीचा पाडा" नावाच्या एका गावात परत ८ वर्षानंतर जाण्याचा अचानक योग आला. 
२००९ मधे त्या गावात एकच विहीर होती आणि एकूण ६ गावांतले लोक फक्त त्या विहिरीवर अवलंबून होते. आणि अडचण ही होती की ती विहीर फेब्रुवारी महिनाअखेर आटून जायची. त्यानंतर, संपूर्ण उन्हाळा, अगदी पाऊस सुरु होईपर्यंत, लोक टँकर वर अवलंबून असायचे, पण तो ४ दिवसांनी एकदा यायचा. ते पाणी विहिरीत ओतलं जायचं आणि मग लोक ते काढून वापरायचे. यात पाणी वाया जाण्याचं प्रमाण खूप होतं. लोकांमधे मारामाऱ्या व्हायच्या, मुलांचं शिक्षण बंद व्हायचं, आरोग्याची वाट लागायची, स्थलांतर खूप व्हायचं. एकुण काय, तर गावाचं चित्र पर वाईट होऊन जायचं. आणि हे वर्षानुवर्ष चालू होतं. लोकांचा सरकार, संस्था, एकूणच माणुसकी यावरचा विश्वास आणि आत्मविश्वास उडाला होता. सगळीकडे नकारात्मक वातावरण होतं. 

आरोहन नावाची एक संस्था तिथे काम करत होती. रोटरी संघटनेच्या आर्थिक मदतीच्या सहाय्याने आणि माझ्या तांत्रिक मदतीने २००९ साली आम्ही तिथे २ झर्यांवर काम केलं आणि योग्य जागा निवडून एक भूमिगत बंधारा बांधला.   
आज ८ वर्षानंतर तिथे गेल्यावर एकूण वातावरण, पाण्याची मुबलक उपलब्धता, त्यामुळे लोकांमधे झालेला सकारात्मक बदल हे बघून खूप समाधान आणि आनंद मिळाला. भागातला भूमिगत जलस्तर उंचावला. जी विहीर पूर्वी फेब्रुवारी अखेर कोरडी व्हायची, ती गेल्या ८ वर्षात एकदाही कोरडी 
आम्ही केलेल्या योजनेमुळे पाण्याचे स्त्रोत मजबूत झाले आणि त्या णी सुरक्षितपणे वर्षभर मिळतं आहे. 
यात आर्थिक मदत रोटरी ने केली असली तरी बाकी काम
लोकसहभागातून केलं गेलं. आणि त्यामुळे, या कामांची जपणूक गावकरी प्रेमाने करतात. गावाचा शाश्वत विकास होतोय. 
आता गावकरी आजूबाजूच्या गावांतल्या लोकांना जल संधारण कामं करण्यासाठी प्रोत्साहित करायचं काम करत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता आमच्या सर्वेक्षणाचं काम ५ गावांमधे सोपं झालं त्यामुळे. या भागात घडणारा हा बदल खूप समाधान आणि उत्साह देणारा आहे.       झाली नाहीये. ६ गावांतले लोक पाणी भरायला येऊनही विहिरीला वर्षभर पाणी असतं. 

गावातल्या लोकांनी पाणी मिळाल्यावर विटा पाडून आपली घरं पक्की करून घेतली, गावातले रस्ते चांगले करून घेतले, गावातला तलाव खोल करून त्यात मासे सोडले आणि त्यापासून पैसे मिळवायला सुरुवात केली.  सर्वात महत्त्वाचं, पाण्यासाठी मारामाऱ्या नाहीत, अपघात नाहीत, मनुष्यहानी नाही, आणि पुरेसं पाणी सुरक्षितपणे वर्षभर मिळतं आहे. 
यात आर्थिक मदत रोटरी ने केली असली तरी बाकी काम लोकसहभागातून केलं गेलं. आणि त्यामुळे, या कामांची जपणूक गावकरी प्रेमाने करतात. गावाचा शाश्वत विकास होतोय. 
आता गावकरी आजूबाजूच्या गावांतल्या लोकांना जल संधारण कामं करण्यासाठी प्रोत्साहित करायचं काम करत आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. आत्ता आमच्या सर्वेक्षणाचं काम ५ गावांमधे सोपं झालं त्यामुळे. या भागात घडणारा हा बदल खूप समाधान आणि उत्साह देणारा आहे.